प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह

आर्यसत्ये

views

4:26
आर्यसत्ये : भगवान बुद्ध म्हणतात, ‘‘मानवी जीवन हे दुःखमय आहे, दुःखाची निर्मिती तृष्णेतून म्हणजेच वासना, इच्छा, आसक्ती, आवड यातून होते, म्हणून या तृष्णेवर म्हणजे आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. यासाठी मध्यम मार्गाचा अवलंब केला पाहिजे. मानवी व्यवहाराच्या मुळाशी चार आर्यसत्ये आहेत. त्यातील पहिले सत्य म्हणजे १) दु:ख – मानवी जीवनात दु:ख असते. प्रत्येकाच्या जीवनात दुख: हे असतेच म्हणजे जगात सर्व सुखी असा कोणी आहे का? नाही...२) दुःखाचे कारण – दु:खाला कारण असते. मनुष्याच्या न संपणाऱ्या इच्छा हे दु:खाचे कारण आहे.३) दु:ख निवारण – दुःखाचे निराकरण वा अंत सर्व प्रकारची आसक्ती सोडण्याने होतो.४) प्रतिपद – प्रतिपद म्हणजे दु:ख अंत करण्याचा मार्ग. दुःख निवारण्यासाठी सदाचाराचा मार्ग (अष्टांग मार्ग) आहे.